माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या मृत्यु हि जन्म घेत असतो. आणि त्या हर एखाद्यला मृत्युपत्र किंवा Will याबद्दल विचारले तर त्यात वाईट किंवा नाराज होण्या सारखी गोष्टच काय? जो जन्माला आला तो कधी न कधी तरी जाणारच. आता जाण्या अगोदर संपूर्ण आयुष्यात त्याने जे काही कमावलेले असेल, भले तो माणूस लखपती, करोडपती नसेल त्याच्या वाटणीचे जे काही असते ते आपल्या पाश्चात कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला मिळावे अशीच त्याची इच्छा असते.
पण जर त्या व्यक्तीने आपले मृत्युपत्र तयार केलेले नसेल त्यातून मृत् पावलेली व्यक्ती कुटुंब प्रमुख असेल तर त्याच्या पाठीमागे जे वारस पात्र उरतात, त्यांना खरा लाभ मिळेपर्यंत त्यांचे हाल होतात, खूप मनस्ताप भोगावा लागतो, सर्व ठिकाणी मृत्युचा दाखला देवूनही प्रसंगी निराशा पदरी पडते आणि लाभ मिळण्यास विनाकारण उशीर होतो. पण जर मृत्युपत्र केले असेल तर मात्र हि प्रक्रिया खूप सोपी कमी कालावधीत होते. आणि आजकालच्या धकाधकीच्या, असुरक्षित जीवनात जिथे कधी काय होईल याचा नेम नाही. अशा वेळी साधारण ५० शीच्या आसपास मृत्युपत्र केले तरी हरकत काहीच नाही.
मृत्युपत्राची नोंदणी कायद्याने आवश्यक नाही पण केलेली असल्यास चांगले , म्हणजे आपली प्रत गहाळ झाल्यास सरकारी कार्यालयातून खरी प्रत मिळू शकते
समाजात मृत्यूपत्र बाबत जे गैरसमज आहेत, ते दूर करण्याचा एक प्रयत्न :-
मृत्युपत्राची नोंदणी कायद्याने आवश्यक नाही पण केलेली असल्यास चांगले , म्हणजे आपली प्रत गहाळ झाल्यास सरकारी कार्यालयातून खरी प्रत मिळू शकते
समाजात मृत्यूपत्र बाबत जे गैरसमज आहेत, ते दूर करण्याचा एक प्रयत्न :-
१) मृत्यूपत्र करण्या साठी वकिलाची गरज नसते; साध्या फुलस्केप पेपर वर किवा A४ साईझ पेपर वर सुद्धा ते करता येते. कोर्ट फी, स्टंप पेपर याचीही काही जरूर नाही.
२) तुम्ही स्वतः आयुषयात कमावलेल्या सर्व चल- अचल (Libalities & Assets) चा त्यात समावेश करावा.
३) जर वारस आज्ञानी, लहान , किवा मतीमंद असेल तर मृत्यूपत्र द्वारे एक विश्वस्त नेमावा जो सर्व प्रकारे अंमलबजावणीस जबाबदार असेल.
३) जर वारस आज्ञानी, लहान , किवा मतीमंद असेल तर मृत्यूपत्र द्वारे एक विश्वस्त नेमावा जो सर्व प्रकारे अंमलबजावणीस जबाबदार असेल.
४) तुमचे मृत्युपत्र हे केव्हाही रद्द करता येते व बदलता येते, किंवा त्यात प्रसंगानुरूप हवे तेव्हा, हवे तेवढे बदलही करता येतात. पण नवीन मृत्युपत्रात , जुने मृत्युपत्र (तारखेचा उल्लेख करून) रद्द कले असे नमूद करावे अथवा ते फाडून नाहीसे करावे.
५) मृत्युपत्रावर किमान दोन विश्वस्तांची / साक्षीदारांची सही त्यांच्या नाव पत्ता सहित घ्यावी , पण जे वारस असतील ते विश्वस्त म्हणून सहीला पात्र नाहीत हे लक्षात घ्यावे.
६) मृत्युपत्र बनवल्यावर त्याची माहिती सर्व वारसांना द्यावी व त्यांना माहित आहे अशा ठिकाणी मृत्युपत्र ठेवावे.
आपल्या माहितीकरिता खाली मृत्युपत्र नमुना देत आहे. जर मायाजाल वरून थेट हवे असेल तर मृत्युपत्र क्रमांक-१ साधे मृत्यूपत्र साठी इथे टीचकी मारा.
छान माहीती.. रेडीमेड म्रुत्युपत्राची लीन्क पण खूप उपयोगि आहे..
उत्तर द्याहटवाछान माहिती
उत्तर द्याहटवा